Monday, April 21 2025 9:38 am
latest

46 खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंब्य्रात जोरदार निदर्शने

देशातील लोकशाहीचे अस्तित्व संपवण्याचा कट- मर्जिया पठाण

ठाणे, 27- देशात हुकूमशाहीचा उदय होत असून त्यातूनच 146 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे, असा आरोप करीत मुंब्रा येथे मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.

संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवीन संसदेत शिरून रंगीत वायू सोडण्याचा प्रकार घडला होता. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार्या विरोधी पक्षाच्या खासदारांना सत्ताधाऱ्यांच्या सूचनेवरून निलंबित करण्यात आले आहे. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेकडो महिला , पुरूष, लहान मुले सहभागी झाले होते. यावेळेस आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या प्रसंगी मर्जिया पठाण म्हणाल्या की, संसदेच्या सुरक्षेची काळजी घेणे हे सत्ताधाऱ्यांचे काम आहे. मात्र, ही सुरक्षा न पाळल्यामुळेच काही तरूण सभागृहात शिरले. त्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यांनी पत्करलेला मार्ग योग्य आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु, त्या बाबत प्रश्न विचारणाऱ्या सुप्रियाताई सुळे यांच्यासह 146 खासदारांना निलंबित केले जात असेल तर ते लोकशाहीला पूरक नाही. या घटनेमुळे देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचे निलंबन रद्द करण्यात यावे, अन्यथा आम्ही या पेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही मर्जिया पठाण यांनी दिला.