ठाणे 20 – महाराष्ट्रामध्ये असे चित्र दिसते आहे की, मुख्यमंत्र्यांचे आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही. किंवा त्यांच्याच पक्षाचे नेते हे मुख्यमंत्र्याचे ऐकत नाहीत. विजय शिवतारे हे राष्ट्रवादीची शक्तिस्थळे, स्वाभिमान, बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचे वातावरण खराब करीत आहेत. शिवतारे हा महायुतीमध्ये दुधामध्ये मीठ टाकण्याचे काम करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा धर्म पाळत आहे पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेत्यांना आवरावे आता खूप झाले, मोदीसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातुन ४५ प्लस खासदार विजयी करणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची समजूत काढून देखील विजय शिवतारे हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे शक्तिस्थळ असलेले बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने फिरुन महायुतीचे वातावरण खराब करण्याचे काम करत आहेत. माझी मुख्यमंत्र्यांना हीच विनंती आहे की, या सर्व प्रकारमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे चित्र जात आहे की, मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब जे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत यांचे आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही. किंवा त्यांच्याच पक्षाचे नेते हे माननीय मुख्यमंत्र्याचे ऐकत नाहीत. अशाच प्रकारे सातत्याने विजय शिवतारे हे याहीपुढे जर माननीय अजितदादा पवारसाहेबांबद्दल आरोप करत बारामती मतदारसंघामध्ये महायुतीचा धर्म जर तोडत राहिले तर महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहे तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात. आम्हाला कुठल्याही प्रकारे महायुतीचे वातावरण गढूळ होईल अशाप्रकारचे वक्तव्य किंवा कृत्य करायचे नाही.पण सातत्याने विजय शिवतारे हे करत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात हाच मेसेज जात आहे की मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब शिवसेना पक्षाचे मुख्य नेते या नात्याने त्यांचे नेते हे त्यांचे ऐकत नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरु आहे. नुकतेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील समन्वय रहावा म्हणून बारामती, पुणे येथे विविध बैठका घेतल्या, अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात महायुतीचे सर्व कार्यकर्ते तिथे कामाला लागले आहेत.
माननीय अजितदादा तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने २०१९ च्या निवडणुकीत बारामती विधानसभेतुन जिंकले होते. तर पुरंदरच्या जनतेने विजय शिवतरे यांना त्यांची जागा २०१९ च्या निवडणुकीत दाखवली होती. त्यामुळे अधिक जुन्या वादामध्ये न जाता देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी, महाराष्ट्रातुन ४५ प्लस लोकसभेचे खासदार जातील ही महायुतीच्या सर्व नेत्यांची व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे.
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभेतुन आपल्या पक्षाचा उमेदवार असावा अशी इच्छा व्यक्त करुन प्रांताध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेबाना पत्र लिहिले. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की त्या त्या लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाचा उमेदवार, आपल्या पक्षाचे चिन्ह घेऊन उभे रहावे, ही त्याची भावना असणं स्वाभाविक आहे. कल्याण मतदारसंघांमध्ये तीन आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांची ही भावना त्यांच्या प्रांताध्यक्षांकडे व्यक्त केली असेल त्याच्यामध्ये काही गैर नाही. पण महायुतीचे नेते जो निर्णय देतील आणि जो काही उमेदवार देतील त्याला विजयी करण्याकरिता आपण महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प करायला हवा.
महायुतीचे नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब, भाजपचे राज्यातील शिर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससाहेब योग्य तो निर्णय घेतील आणि कल्याण लोकसभेबाबत योग्य तो निर्णय घेतील आणि कल्याण लोकसभेमधून महायुतीचाच उमेदवार हा मागच्यावेळेपेक्षा देखील जास्त विक्रमी मताधिक्याने विजयी झालेला असेल. याबाबत लवकरच भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील शिर्ष नेतृत्व, गृहमंत्री अमितभाई शहासाहेब, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डासाहेब, यांच्याबरोबर राज्यातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील आमचे नेते जाऊन तिथे चर्चा करतील आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये महायुतीचा फॉर्म्युला येईल आणि महायुतीचे ४५ प्लस खासदार महाराष्ट्रातून विजयी झालेले असतील, अशी आशा प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केली.
चौकट
संग्राम थोपटे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चिन्हावर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. काँग्रेसच्या कोटय़ातून त्यांना मंत्रीपद का मिळाले नाही ? हे आमच्यावर आरोप करण्यापेक्षा काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना त्यांनी तो प्रश्न विचारला तर अधिक संयुक्तिक राहील.
चौकट
मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते, देशाचे गृहमंत्रीअमितभाई शहा यांची भेट घेतली. काय राजनीतिक चर्चा झाली आम्हाला माहीत नाही पण जो निर्णय महायुतीचा होईल त्याच्यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा हाच संकल्प आहे की ४५ प्लस खासदार लोकसभेसाठी महाराष्ट्रातुन निवडून दिल्लीत गेले पाहिजेत.