Monday, May 12 2025 4:41 pm

दलितमित्र पुरस्कार प्राप्त एकनाथ बिरवटकर यांचा महाराष्ट्र संपादक परिषदेतर्फे गौरव

श्रीरामपूर,19- मुंबई येथे महाराष्ट्र संपादक परिषदेचे सचिव एकनाथ बिरवटकर यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा दलितमित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे व ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र आवटी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
मुंबई येथील पार्क क्लब स्काऊट हॉल शिवाजी पार्क दादर मुंबई येथे महाराष्ट्र संपादक परिषदेच्या 19 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे कोषाध्यक्ष राजु पाध्ये उपाध्यक्ष सुधीर जाधव गजानन चव्हाण ज्येष्ठ संस्थापक सदस्य रमेश खोत सदस्य हेमंत सामंत गोरख तावरे धोंडोपंत विष्णूपुरीकर विभव बिरवटकर हिराचंद ब्राह्मणे बाळकृष्णा साळुंखे अमोल आंबेकर भारत गट्टेवार अरुण सुरवडकर यांच्यासह अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संजय मनमे म्हणाले बिरवटकरांनी गेल्या अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ व महाराष्ट्र संपादक परिषदेच्या माध्यमातून अनेक पत्रकारांना व्यासपीठ उभारून त्यांना लिहिते केले आहे. दलित वंचित उपेक्षित बांधवांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले आहे. पत्रकारितेमध्ये पत्रकारिता करत असताना समाजातील अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे.विविध विषयावर विस्तृत लेखन त्यांनी केले आहे समाजाच्या विविध विकास कामांना प्राधान्याने प्रसिद्धी देऊन शासनाचे सकारात्मक धोरणांना तळागाळापर्यंत पोहोचवले आहे. अशा सर्व कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्कार दिला आहे. हा संपादक परिषदेचा गौरव आहे असे मलमे म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना एकनाथ बिरवटकर म्हणाले माझे आयुष्यात हा सर्वोच्च सन्मान असून हा दलितमित्र पुरस्कार मी माझे गुरु स्वर्गीय यशवंत पाध्ये व संपादक परिषदेला समर्पित करीत आहे. स्वर्गीय यशवंत पाध्ये सारखे गुरु नसते तर मी आयुष्यात घडलोच नसतो. माझ्या गुरूंना यापूर्वी दलितमित्र पुरस्कार देऊन शासनाने गौरविले होते. आज त्यांच्या शिष्याला हा दलितमित्र पुरस्कार देऊन शासनाने मला त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याची संधी प्राप्त केली आहे. गेली 25 वर्ष मी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ व संपादक परिषदेच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात कार्यकरीत आहे .हे मी माझे भाग्य समजतो समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर प्रखरपणे लेखन करून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे स्वर्गीय पाध्ये यांनी माझ्यावर केलेले संस्कार हे आज कामे आले आहेत.प्रामाणिक व निर्भीड पत्रकारिता हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता केली आहे. आपण केलेल्या सकारात्मक पत्रकारितेची व कामांची शासनाने दखल घेऊन मला आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित केले. आणि माझ्या आयुष्याचे सोने झाले. असे मी समजतो यापुढील काळातही आपण संपादक परिषदेसाठी व पत्रकारितेसाठी कार्यरत राहू त्यासाठी सर्व सहकाऱ्यांनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दिशादर्शक काम करण्यासाठी सहकार्य करावे. असे आव्हान एकनाथ बिरवटकर यांनी केले आहे.