Monday, March 17 2025 11:15 pm

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी पुढाकार

ठाणे, ७ दिवसेंदिवस प्लॅस्टिक वापर वाढत आहे. शहरी भागात तसेच ग्रामीण भागात देखील प्लॅस्टिक वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.‌ प्लॅस्टिक व्यवस्थापन आव्हान म्हणून समोर उभे राहिले असताना जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत प्लास्टिक व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेऊन कामास सुरुवात केली आहे. गावातील रस्त्याच्या कडेला व महामार्गावर प्लॅस्टिक सारख्या घातक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी भिवंडी, अंबरनाथ, शहापूर येथे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.‌

प्लॅस्टिक पुणर्वापर औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान ठरत आहे. औद्योगिक क्षेत्रात इंधनाच्या स्वरूपात प्लॅस्टिक वापरले जाणारे आहे. तसेच मा‌. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत प्लास्टिक पासून रस्ता तयार करण्यात येणार आहे. भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी एक मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोटेक कंपनी पुढाकार घेत आहे. ठाणे जिल्ह्यातील महानगर पालिका ज्या पद्धतीने शहरी भागातील कचऱ्याचे व्यवस्थापन करते तसे ग्रामीण पातळीवर व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषदेला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले.‌ गाव पातळीवर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी काल्हेर येथे प्लॅस्टिक व्यवस्थापन केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. १५ वित्त आयोगाच्या माध्यमातून २८ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात प्रत्येकी दीड कोटीचा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होणार आहे अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख यांनी दिली.

जागेसाठी पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत पातळीवर ८० लाख रुपये निधीतून जागेची हमी घेणे, ५० काचरा वेचक महिलांचे पथक नेमणे व त्यांच्या मार्फत कचरा गोळा करून विघटन करणे, साप करुन, वाळवून, मशीन द्वारे बारीक तुकडे करून प्रक्रिया केंद्रात पाठविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद तर्फे पहिल्यांदा प्लॅस्टिक व्यवस्थापनेसाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.‌