Monday, May 19 2025 10:51 pm

ठाणे ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद सज्ज

ठाणे, 10 स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्ह्यातील गावे हागदारी मुक्त करणे व ग्रामीण भागातील शहरालगतच्या ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरुपी स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे विविध उपाययोजना राबवित आहे. शहरालगतच्या व हायवेलगच्या ग्रामपंचायतीमध्ये वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहरालगतच्या 80 गावामधुन रोज मोठ्याप्रमाणावर कचरा हा रस्त्यालगत टाकण्यात येत आहे.

या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत KoboToolBox ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने कचरा असलेल्या ठिकाणचे फोटो व माहिती स्वच्छ भारत मिशन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत भरण्यात आले आहे. तेथील कचरा लवकर उचलण्यात यावा तसेच गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी केले आहे.

अनेक वर्षा पासुन साठलेला अंदाजे 4800 टन कचरा उचलण्यासाठी नियोजन करण्यात आले होते तसेच 8 एप्रिल 2024 पर्यंत 4380 इतका टन कचरा उचलण्यात आले आहे. 91.25 टक्के काम पुर्ण करण्यात आले आहे. ग्रामीण भागात हायवेलगतच्या ग्रामपंचायती समोर कचरा उचलण्याची मोठी समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी प्रथम KoboToolBox ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने कचरा असलेल्या जागाची माहिती मागविण्यात आली आहे. ग्रामपंचायत निहाय्य किती कचरा उचलला जात आहे यांची माहिती देखील दररोज घेण्यात येत आहे. ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे तसेच आवश्यकता पडल्यास दंडात्मक कार्यवाही देखील करण्यात येईल. – उप मुख्य कार्यकारी अधिकिरी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख अतुल पारसकर

ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत ५ पंचायत समिती क्षेत्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य मार्गावर पडलेला कचरा पहिल्या टप्प्यात दि. १५/४/२०२४ पर्यंत उचलून नियोजित डम्पिंग ग्राउंड वर टाकण्यात येत आहे. सदर कचऱ्याचे मजुर व कचरावेचकांद्वारे वर्गीकरण करून न कुजणारा व पुनर्वापर करता येण्यास योग्य असणारा कचरा रिसायकलर्स यांना सुपूर्द करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील मार्गावर आवश्यकतेनुसार जेसीबी डंपर्स व मजूर यांच्याद्वारे स्वच्छता राखण्याचे व पडलेला कचरा उचलण्याची कार्यवाही सुरू ठेवण्यात आली आहे.